मोठी बातमी : विकलेल्या जमिनी होणार पुन्हा मूळ मालकांच्या नावावर December 21, 2024 by sarkari mitra मोठी बातमी विकलेल्या जमिनी होणार पुन्हा मूळ मालकांच्या नावावर Land Record New Rule 2024 : जमीन खरेदी व नोंदणी प्रक्रियेत अडचणी गाव-शहरालगतच्या एक-दोन गुंठ्यांपासून वीस गुंठ्यांपर्यंत शेतजमिनीची खरेदी रीतसर कागदपत्रांद्वारे केली गेली आहे. या प्रक्रियेत शासनाला स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरले जाते. खरेदी नंतर तलाठ्याच्या सहाय्याने सातबारा उताऱ्यात नोंद घेतली जाते. 👉👉तुमच्या जमिनीचे सातबारा उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈 तक्रारींचे स्वरूप अलीकडे काही लोकांनी सातबारा उताऱ्यात विकलेल्या जमिनीचा पुन्हा मूळ विक्रेत्याच्या नावावर नोंद होण्याबाबत तक्रारी केल्या आहेत. अशा प्रकारच्या तीन तक्रारी आल्या असून, अनेक लोकांनी सातबारा उतारे तपासले नसल्याने त्यांना त्यांच्या मालकीत बदल झाल्याचे कळलेले नाही. 👉👉👉ही 2 कागदपत्रे असल्यावरच मिळणार 6 वा हप्ता 2100/- रुपये👈👈👈 भांडणं वाढवणारी परिस्थिती सातबारा उताऱ्यात झालेल्या बदलांमुळे विक्रेता व खरेदीदार यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी लोकांची मागणी आहे. तुकडे बंदी कायदा व त्याचा परिणाम तुकडे बंदी कायद्यानुसार काही मंडल अधिकाऱ्यांनी विकत घेतलेल्या जमिनीला ‘बेकायदेशीर खरेदी’चा शेरा मारला आहे. त्यामुळे काही ठिकाणी ती जमीन मूळ हक्कात तर काही ठिकाणी ‘इतर हक्कांमध्ये’ दाखवली जात आहे. 👉👉👉अधिक माहिती येथे वाचा👈👈 संगणकीय प्रणालीतील त्रुटी तलाठ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणकीय प्रणालीमुळे विकलेल्या जमिनीचा मूळ मालकाचा हक्क सातबाऱ्यावरून कमी होत नाही. परिणामी, विक्री नंतरही मूळ मालकाच्या नावावर जमीन नोंद होते. लोकांची मागणी लोकांची मागणी आहे की विक्रेत्याच्या नावाची नोंद त्वरित कमी करून खरी खरेदीदारांच्या नावावर हक्काने जमीन नोंदवावी. 👉👉महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈